Tuesday, September 18, 2018

खरिपाची पिके निघेपर्यंत खडकपूर्णा साठ्यातील पाणी बंद करू नका -मनोज कायंदे

देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
         खडकपूर्णा धरणातील उपसा सिंचन  द्वारे शेतकरी आपल्या शेतातील पिकांना पाणी देत असून त्यावर जवळपास शेकडो शेतकऱ्यांची जमीन अवलंबून आहे परंतु अचानकपणे खडकपूर्णा प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित सर्व  ग्रामपंचायतींना शेतकऱ्यांचा पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे ऐन घासा तोंडाशी आलेली शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक करपणार आहेत आणि शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या च्या दिशेने जाऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांचे पीक वाचण्यासाठी खरीप हंगाम निघेपर्यंत बुडीत शेत्रातील बाधित शेतकऱ्यांना पाणी उपसा करून द्यावा व दुष्काळात होरपळणाऱ्या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या घसातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी खडकपूर्णा धरणातील पाणी उपसा हा खरिपाची पिके निघेपर्यंत प्रशासनाने चालू ठेवावा जेणेकरून कष्टकरी शेतकरी वर्गाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही त्यामुळे उपसा चालू ठेवावा अशी मागणी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते मनोज कायंदे यांनी निवेदनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील जिल्हा पुनर्वसन आधिकारी सावंत मॅडम यांना केली त्यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन काकड, नारायण हुसे,नरहरी काकड,दत्ता मिसाळ,गणेश सरोदे, सतीश वाघमारे आदी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment