आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडं
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
गेल्याअनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्या मूळे हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील पिके पावसा अभावी वाळून गेली आहे गत काही काळापासून शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत दरवर्षी अपेक्षा ठेऊन संघर्ष करीत आहे ऐन पीक बहरात असतानाच पावसाणे उघडीप दिल्याने तोंडाशी आलेला घास गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवरआली आहे राज्यसरकारने दुष्काळ ग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली आहे यामध्ये देऊळगाव राजा व चिखली तालुका वगळण्यात आला आहे त्यामुळे देऊळगाव राजा व चिखली तालुका दुष्काळ ग्रस्त घोषीत करावा,अशी मागणी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जालना येथे भेट घेऊन मागणी केली आहे केली आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे,ना बबनराव लोणीकर राज्य मंत्री ना अर्जुन खोतकर आदी मंडळी उपस्थित होते. देऊळगाव राजा व चिखली तालुक्यात खरीप हंगामात दमदार पावसाचे आगमन होऊ न शकल्याने सोयाबीन,मका, कपाशी व अन्य पीकवाळून गेले आहे . पावसाचा खंड दोन महीने पेक्षा जास्त असून सोयाबीन,मका तसेच कापूस ही पिके पूर्णपणे वाळली आहे.अशा परिस्थितीत पावसाअभावी वाढत्या तापमानाने पिके धोक्यात आले आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवाळी सारखा सण कसा साजरा करावा परिवाराचा उदरनिर्वाह करण्याची मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे उभी राहिली आहे.तालुक्यातील खडकपूर्णा धरणा सह अन्य छोटे मोठे प्रकल्प कोरडे ठनठणीत तर काही ठिकाणी जलसाठा नगण्य अवस्थेत पोहचल्याने अनेक गावात पिण्याच्या व जनावरांना पिण्याच्या पाण्यावर व परिसरातील सिंचन क्षेत्रावर विपरीत परिणाम जाणू लागला आहे.त्यामुळे सर्वत्र दुष्काळाचे गडद सावट कोसळलेली आहे. दमदार पाऊस न पडल्यामुळे खडकपुर्णा धरणात व इतर सिंचन प्रकल्पात पाहिजे तेवढे पाणी जमा होऊ शकले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली आहे. अशी भीषण परिस्थिती आहे नुकतीच कृषि राज्यमंत्री ना सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली, देऊळगाव राजा तालुका दुष्काळ ग्रस्त यादीत नसल्याने हा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी सांगितले.
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
गेल्याअनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्या मूळे हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील पिके पावसा अभावी वाळून गेली आहे गत काही काळापासून शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत दरवर्षी अपेक्षा ठेऊन संघर्ष करीत आहे ऐन पीक बहरात असतानाच पावसाणे उघडीप दिल्याने तोंडाशी आलेला घास गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवरआली आहे राज्यसरकारने दुष्काळ ग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली आहे यामध्ये देऊळगाव राजा व चिखली तालुका वगळण्यात आला आहे त्यामुळे देऊळगाव राजा व चिखली तालुका दुष्काळ ग्रस्त घोषीत करावा,अशी मागणी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जालना येथे भेट घेऊन मागणी केली आहे केली आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे,ना बबनराव लोणीकर राज्य मंत्री ना अर्जुन खोतकर आदी मंडळी उपस्थित होते. देऊळगाव राजा व चिखली तालुक्यात खरीप हंगामात दमदार पावसाचे आगमन होऊ न शकल्याने सोयाबीन,मका, कपाशी व अन्य पीकवाळून गेले आहे . पावसाचा खंड दोन महीने पेक्षा जास्त असून सोयाबीन,मका तसेच कापूस ही पिके पूर्णपणे वाळली आहे.अशा परिस्थितीत पावसाअभावी वाढत्या तापमानाने पिके धोक्यात आले आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवाळी सारखा सण कसा साजरा करावा परिवाराचा उदरनिर्वाह करण्याची मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे उभी राहिली आहे.तालुक्यातील खडकपूर्णा धरणा सह अन्य छोटे मोठे प्रकल्प कोरडे ठनठणीत तर काही ठिकाणी जलसाठा नगण्य अवस्थेत पोहचल्याने अनेक गावात पिण्याच्या व जनावरांना पिण्याच्या पाण्यावर व परिसरातील सिंचन क्षेत्रावर विपरीत परिणाम जाणू लागला आहे.त्यामुळे सर्वत्र दुष्काळाचे गडद सावट कोसळलेली आहे. दमदार पाऊस न पडल्यामुळे खडकपुर्णा धरणात व इतर सिंचन प्रकल्पात पाहिजे तेवढे पाणी जमा होऊ शकले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली आहे. अशी भीषण परिस्थिती आहे नुकतीच कृषि राज्यमंत्री ना सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली, देऊळगाव राजा तालुका दुष्काळ ग्रस्त यादीत नसल्याने हा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी सांगितले.



छान
ReplyDelete